Tuesday, August 19, 2008
हितचिंतक..
एकदा मी माझ्या तंद्रित चाललो होतो.एक वळनाशी येउन पुढचे पाउल टाकणार तोच आवाज आला,थांब!एक पाउलहि पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोक्यावर पडेल."मी थांबलो,अन काय आचर्य खरेच वरुण एक आखिच्याआखी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वलून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजुबाजुची लोंक अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो हातात खरेदी केलेल्या कपड्याच्या पिशव्या होत्या.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवाशिचा आवाज ऐकू आला."थांब.एक पाउलहि पुढे टाकू नकोस.एक ट्रकचा ताबा सूटलाय अन तो लाल दिवा तोड़नार आहे."अन खरच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.मी हडबडलो." तू कोण आहेस?"मी जोरात म्हणालो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,"तू कोण आहेस?"तो म्हणाला,"तुझा मित्र,हितचिंतक!"मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,"Thank you"मी रडत रडत त्याला प्रश्न केला,"खुप उशिरा भेटलास!मी लग्न करताना कुठे होतास?"तो रागात म्हणाला,"तो भटजी म्हणजे मीच होतो नि तुला सांगत होतो,"सावधान"!पण...तू कुठे एकतो...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment