Tuesday, September 23, 2008

हे राज्य मराठ्यांचे नव्हे, मराठी माणसांचे असेल, असे विधान राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणताना केले होते. चव्हाण हे मराठा होते. तरीही हे राज्य केवळ मराठ्यांचे असणार नाही व ते तमाम मराठी माणसांचे असेल, असे त्यांनी सांगितले होते. हे मराठा समाजाने कायमचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या मराठी माणसांतही महात्मा फुले यांच्या बहुजन समाजाच्या व्याख्येनुसार जो रंजला गांजलेला समाज आहे त्याच्या सर्वंकष कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले होते.

महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती किंवा कोणत्या जातीची संख्या किती हे ठामपणाने सांगता येत नाही. कारण १९३१ नंतर जातीनिहाय खानेसुमारी झालेली नाही. तरीही महाराष्ट्रात कोणत्याही जातीपेक्षा मराठा जातीचे संख्याबळ अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. मराठा ही जात अथवा जातसमूह शेती आणि सैन्य यांच्याशी संबंधित होती. पंचकुळी, शहाण्णवकुळी हे घटक वतनाशी संबंधित होते तर वतनाशी संबंधित नसलेले पण शेती करणारे कुणबी किंवा कुळवाडी यांचाही समावेश मराठ्यांत केला जात असल्याने समाजशास्त्रीयदृष्ट्या मराठा जातीला जातसमूह म्हणजेच क्लस्टर ऑफ कास्ट असेही मानतात. लग्नाच्या बाबतीत पदर लागतो का हे पूर्वी पाहिले जात असे, काही प्रमाणात आजही पाहतात. पण कोण कोणत्या पदावर, हुद्यावर, किती मालदार, किती शिकला, काय करतो याला हल्ली पदरापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पंचकुळी, शहाण्णवकुळी आणि शेतीशी संबंधित असलेले इतर मराठा यांच्यात हल्ली विवाहसंबंधही होतात. अनुलोमच नव्हे तर प्रतिलोमही. पंचकुळी व शहाण्णव-कुळीचा सुंभ जळाला आहे, पण पीळ थोडाफार कायम आहे, विशेषत: पंचकुळीत. पण काळाच्या ओघात मराठा नावाचा जातसमूह आता जात या संकल्पनेत समाविष्ट झाला आहे. पूर्वी ज्यांना मराठा न्हावी, मराठा परीट आणि निव्वळ कुणबी म्हटले जायचे, या जाती मराठा जातीपासून वेगळ्या झाल्या. त्यांना मराठा समाजाने स्वीकारले नसावे. या जाती मराठा जातसमूहापासून काही अंतरावर होत्या. कालांतराने या जातींचा समावेश इतर मागास समाजात झाला.

मराठ्यांचे संख्याबळ जास्त असले तरी वतनदार वगळता शेती आणि सैन्याशी संबंधित असलेला बाकीचा समाज हा दारिद्यातच होता. अख्ख्या बहुजन समाजालाच शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात अनेकांनी शिक्षण प्रसाराच्या चळवळीत झोकून दिले. बहुजन समाजाची शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती. जातीचे अडथळेही होते. त्यामुळे जातवार बोर्डिंग सुरू करण्यात आली. शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. गरीब ब्राह्मण शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी माधुकरीची पद्धत होती. तशी इतर समाजात तरतूद नव्हती. पण ब्राह्माण समाजातील हा आदर्श पुढे काही वतनदार मराठ्यांनी घेतला. तेही गरीब बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आपल्याकडे शिक्षणाला ठेवून घ्यायला लागले. शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भगीरथ प्रयत्नांनी शिक्षणाची गंगाच महाराष्ट्रात आणली म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाचा परिसस्पर्श झाला. तिथूनच बहुजन समाजाच्या भौतिक प्रगतीची घोडदौड सुरू झाली.

यशवंतराव चव्हाणांनी सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठेच नव्हे तर बहुजनांतील प्रत्येक दीनदुबळ्या समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्याचे धोरण घेतले. म्हणून साता-यासारख्या मराठ्यांच्या बालेकिल्ल्यातही परीट, न्हावी अशा इतर मागास समाजातील कार्यकर्त्यांना तिकीट देऊन सत्तेत सहभागी करून घेतले. प्रतिष्ठा दिली. बळ दिले. त्यासाठी पंचकुळीच्या अहंकाराचीही त्यांनी तमा केली नाही. उलट अशांना त्यांनी खड्यासारखे राजकारणातून बाजूला केले आणि हे ख-या अर्थाने बहुजन समाजाचे राज्य आहे, हे जगाला दाखवून दिले. त्याच यशवंतरावांना तथाकथित कुलीन मराठ्यांनी खाजगीत हीनकुळाचे ठरवायलाही कमी केले नव्हते. पण यशवंतरावांनी त्यांना भीक घातली नाही. कुणबी असो की परीट, न्हावी असो की भंडारी, माळी, बौद्ध, मातंग अशा अठरापगड घटकांची मोट बांधली. फुल्यांच्या संकल्पनेतील बहुजन समाजाची एकजूट घडवून त्यांनी या समाजाला ताठ मानेने उभे केले.

बहुजन समाजात मराठ्यांचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे शिक्षणाचे, प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि राजकारणाचेही सर्वाधिक फायदे या समाजाला मिळाले. त्यामुळे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या समाजाला मिळाली. तीही बहुजन समाजातील इतर घटकापेक्षा अधिक. तालुका पंचायतीपासून जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधिमंडळ, संसद व सत्तेत सगळ्या पातळ्यांवर या समाजाला कोणाहीपेक्षा कितीतरी जास्त प्रतिनिधित्व आहे. नोकऱ्यांतील प्रमाण कोणाहीपेक्षा जास्त आहे. पण राजकारण आणि सत्ताकारणाच्या पलीकडेही शिक्षणक्षेत्रात, कारखानदारीत, उच्चशिक्षणात, प्रशासकीय सेवेत, लष्करात, तंत्रज्ञानात, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधनात, देशात आणि देशाबाहेरही विविध क्षेत्रांत मराठा समाज कर्तृत्वाच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. हे फुले-शाहूंपासून यशवंतरावांपर्यंत झालेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की राजकारणाशी संबंधित असलेल्या बहुतेक मराठ्यांनी हे आदर्श कधीच झुगारून दिलेले आहेत. गुणवत्तेच्या बुद्धिभेदावर राजकीय फायदे उपटण्याचा प्रकार प्रथम यांनीच सुरू केला. आर्थिक निकषावर राखीव जागांची मागणी करीत बहुजन समाजात फूट पाडली आणि जात व धर्मावर आधारलेले फॅसिस्ट तत्त्वज्ञान गावागावात नेले. गरीब आणि बेरोजगार मराठ्यांची माथी भडकावून दीनदलित दुबळ्या समाजाला लक्ष्य केले. सहकार व राजकारणातील मराठ्यांनी तर बहुजन समाजातील इतर घटकांचे हक्क नाकारून कुटुंब आणि गोतावळ्याच्या दावणीलाच सगळी सत्ता बांधली आहे.

गरिबी, अशिक्षितपणा सगळ्या समाजात आहे. मराठा समाजाने मोठी प्रगती केलेली असली तरी मराठ्यांमध्ये गरिबांचे प्रमाण मोठे आहे. पण आजही जातीच्या उतरंडीप्रमाणे आपण खालीखाली गेलो तर दारिद्य, अशिक्षितपणा याचे अधिकाधिक विदारक चित्र दिसते. अख्ख्या जातीत एखादा टक्का सुस्थितीत दिसतो. भटके-विमुक्त-आदिवासींत एखादाच सुशिक्षित व सुस्थितीत आढळतो. बहुजन समाजाच्या तळाशी जसजसे जाऊ तसतसे दारिद्याचे चित्र गडद होत जाते. याकडे आता कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

उलट आपल्यातील गरिबीचे भांडवल करून सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेला मुकलेल्या घटकांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठा समाजातील कुणबी समजाचा आणि त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी केली जात आहे. दडपण आणण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले जात आहेत. खरे म्हणजे महाराष्ट्रात अभिजन ब्राह्मण वगळता उरलेले बहुजन शूद्रातिशूद्र होते. क्षत्रिय होते की नव्हते याबद्दल वाद आहेत. पण ब्राह्मण पुरोहितशाहीच्या नादी लागून मराठ्यांनी क्षत्रियत्वाचे दावे केले, ही वस्तुस्थिती आहे. आज तेच मराठे आम्हाला कुणबी समजा आणि ओबीसीत समावेश करा, अशी दुटप्पी मागणी करू लागले आहेत. यामुळे तमाम मराठी समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तासंपत्तीच्या केंद्रीकरणामुळे इतर सगळ्या समाजांत मराठ्यांविषयी तिटका-याची भावना वाढत आहे. अशावेळी काहीजणांनी गरीब मराठ्यांना भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यांना मराठा धनदांडग्यांशी लढवण्याऐवजी गरिबांच्या पंगतीतील पत्रावळ्या ओढण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यातून उद्या गरीब मराठ्यांचे कल्याण होण्याऐवजी अख्ख्या बहुजन समाजातच अराजक माजणार आहे. एका बाजूला शिवाजी महाराजांचे, शाहूंचे नाव घ्यायचे आणि दीनदलितांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवायचा, ही या प्रभृतींची बदनामीच आहे. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी, शाहू आणि यशवंतराव हे आमचे कोणी लागत नाहीत, इतके तरी जाहीर करा. तेवढेच त्यांच्यावर उपकार होतील.

Wednesday, September 10, 2008

"मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे."

"मी मराठी मी मराठी"

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...

जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!
असा तो एखादाच असतो!
असा तो एखादाच असतो!


असा तो एखादाच असतो ...
जवळ नसुनही जवळचा वाटतो
नबोलताच खुप काही सांगुन जातो
मनातली सल मनातच ठेवत
मनात कुठेतरी घर करुन जातो !

असा तो एखादाच असतो ...
स्वःताच जग बदलुन जातो
आठवणींच्या पाउलखुणाच मागेठेवुन जातो
कधी आपणच त्या वाटेकडे बघत बसतो
खुणांचा मागोसा घेत कुठे तरी हरवतो !

असा तो एखादाच असतो ...
चुकल्या वाटेवर परत भेटतो
क्षणभर आपणच मग बावचळतो
डोळे बंद करुन त्याच्याकडे झेपावतो
पण डोळे उघडताच स्वप्नभंग होतो !

असा तो एखादाच असतो ...
स्वप्नातच तो आपल्याला हसवुन जातो
आपणच मग आपल्याला सावरतो
आरशात बघत स्वःतालाच विसरतो
मात्र तो..सुख देवुन दुःख घेवुन जातो !

मी मराठा आहे!

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...

शिवा पाहिजे

सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन त्याचे दात
अशी आमची मर्द मराठा जात



अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

प्रेम

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत


एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत

म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत"

Monday, August 25, 2008

........आणि हे आपणास माहीत आहे का?

...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?

...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?

...की डासांना दात सुद्धा असतात...?

...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?

...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?

...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?

...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?

...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?

...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?

...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?

...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?

...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?

...की बदकाच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी येत नाही...?

...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?

...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?

...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?

...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?

...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?

...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही...?

...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?

...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?

...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?

...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?

...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?

...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?

...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?

...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?

श्री साईबाबांची अकरा वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥
नवसास माझी पावेल समाधी । धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥
नित्य मी जिवंत,जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥
जो जो,मज भजे,जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे,मीही त्यासी ॥ ७ ॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥
माझा जो जाहला कायावाचामनीं । तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥
साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥

Tuesday, August 19, 2008

भारत देश मागे का पडलाय?...

... आपली लोकसंख्या आहे १०० कोटी

त्यातले ७.९० कोटी लोक रिटायर्ड आहेत

३० कोटी राज्य सरकारी नोकरीत

१७ कोटी केंद सरकारच्या चाकरीत

( दोन्हीही काम करत नाहीत)

एक कोटी लोक आयटी उद्योगात आहेत

( ते काम करतात, पण भारतासाठी नव्हे)

२५ कोटी शाळकरी मुले आहेत

दोन कोटी तर पाच वर्षांखालची बालके आहेत

१५ कोटी बेरोजगार आहेत

१.२ कोटी हॉस्पिटलात अॅडमिट असतात

७९,९९,९९८जण तुरुंगात आहेत

उरले दोघे...

म्हणजे तुम्ही आणि मी...

तुम्ही SCRAP वाचण्यात वेळ घालवताय...

मी एकटाच देशाचा गाडा कसा हाकू?!!!!!

कहाणी ही एका वेडया मनाची

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची

मैत्रीचं नातं

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

हितचिंतक..

एकदा मी माझ्या तंद्रित चाललो होतो.एक वळनाशी येउन पुढचे पाउल टाकणार तोच आवाज आला,थांब!एक पाउलहि पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोक्यावर पडेल."मी थांबलो,अन काय आचर्य खरेच वरुण एक आखिच्याआखी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वलून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजुबाजुची लोंक अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो हातात खरेदी केलेल्या कपड्याच्या पिशव्या होत्या.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवाशिचा आवाज ऐकू आला."थांब.एक पाउलहि पुढे टाकू नकोस.एक ट्रकचा ताबा सूटलाय अन तो लाल दिवा तोड़नार आहे."अन खरच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.मी हडबडलो." तू कोण आहेस?"मी जोरात म्हणालो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,"तू कोण आहेस?"तो म्हणाला,"तुझा मित्र,हितचिंतक!"मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,"Thank you"मी रडत रडत त्याला प्रश्न केला,"खुप उशिरा भेटलास!मी लग्न करताना कुठे होतास?"तो रागात म्हणाला,"तो भटजी म्हणजे मीच होतो नि तुला सांगत होतो,"सावधान"!पण...तू कुठे एकतो...

मैत्री

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
लगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!

आम्ही मराठी आहोत

आम्ही मराठी आहोत कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरीगुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवरकडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..आम्ही मराठी आहोत कारण कॉलेज मधून येताना टाइमपासमंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..आम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकलेतरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..आम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी..आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवायआमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरीदिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात.......... जय महाराष्ट्र!...
क्षणभंगुर जीवनात स्वार्थ फार लहान आहे.
त्याचा त्याग केला तर अर्थ खरंच महान आहे.

उमलणा-या प्रत्येक कळीचा कोमलपणा तितकाच सोज्वळ आहे.
फुल कुठे उमलले, त्यामुळे का त्याचे अस्तित्व बदलणार आहे?
गुलाबाच्या मळ्यातले आणि ओसाड रानातले गवताचे फुल, एकच असणार आहे.
मग का त्याचे अस्तित्व, रानात राजाप्रमाणे आणि मळ्यात नसल्यात जमा असणार आहे?

जीवन जाळ्यात योग्य वाट निवडणे महत्वाचे आहे
उन्नतीची निवडली तर ठीक, नाही तर सगळच 'GONE' आहे.
म्हणुन, पाण्याच्या थेंबानेकुठे पडावे हे जाणणे गरजेचे आहे
कारण, तव्यावर पडला तर तो संपणार आणि शिंपल्यात त्याचा मोती होणार आहे.

लावलेली प्रत्येक मेणबत्ती एक दिवस विझणार आहे.
तिने दुसरीला प्रज्वलित केले तरच, तिचा प्रकाश तेवत राहणार आहे
म्हणुन दुस-यांसाठी जगणेच जीवनाची गोळा बेरीज वाढवणार आहे
कारण तीच गोष्ट फ़क्त, एकाचवेळी दोन जीवन जगल्याचा आनंद देणार आहे.

सुखाच्या सावलीत दू:खाचा कवडसा असणार आहे.
तुम्ही त्यात कसे विसावतात यातच तुमचे सामर्थ्य दिसणार आहे.
कुठलंही काम मनापासून करणे फायद्याचे ठरणार आहे
कारण, हर्षोल्हासाने केलेली कुठलीही गोष्ट सिद्धीस जाणार आहे
फार अवघड नाही आहे साधी सोपी,
सांगतो आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,

भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे ,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,.

समाधानाची नरम पोळी , सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,

फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,

आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,

काय म्हणता.?..मसाले ... ते कसा विसरेन मी,
राग, लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणतो मी,

रेसिपी संपली असे समजू नका , एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,

रोज तृप्त होऊन असाच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे......

"मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो".

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,जिवनाचा अर्थ कळाला नाही !

मी कुठेतरी वाचलं आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं नाही आलं तर ते आपलं नव्हतंच
पण ते परत आलंच नाही,मला कधी कोणी माझं वाटलंच नाही !

आता मी वाचणं सोडलं पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय !

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,तर क्षितीज नक्की गाठता येत.
आपल्या रक्तातच धमक असेल,तर जगंही जिंकता येत.
आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.!

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं !
वेदना कोणती तरी होती ....
तू दिलेली दवा बरी होती !!

भेटली ना मने तुझी माझी
भोवती आडवी दरी होती !!

हासतो आजही जरी खोटा ....
कालची आसवे खरी होती !!

नाव घेतेस का कधी माझे ?
ुतू तशी फार लाजरी होती !!

सोडुनी का उदास माहेरा ?
हाय तू दूर सासरी होती !!

हात मागू नवा कशासाठी ?
जिन्दगानीच आखरी होती !!!

बोललो ना जरी कधी तेंव्हा
तूच 'स्वप्नातली परी' होती
मळ्कट रस्ता
मळकट सार्‍या दिशा
आणखी
मळभटलेली येथील जनता
मळकट मळकट आहे सारे
खरे
परंतू...

परंतू
मळभटलेल्या याच दिशेने
सुर्य उगवतो;
याच दिशेने येतो वारा
याच दिशेने पाणी घेऊन येती मेघ
मळकट घामाच्या धारेतुन फ़ुलते सारे
सारी सुबत्ता, सारे धन-दे
दाणा पाणी
कपडा लत्ता
बाग बगीचे
झगमग चकचक
सुगंध अत्तर
गाड्या रस्ते
गाद्या तक्के
या चिखलातुन येते सारे

जरी असला किती चिखल तरीही
या चिखलातच धान्य उगवते
जरी पसरला धूर कितीही
या धूरातच स्वप्न प्रसवते
सारे जगणे यातून येते
ऐश्वर्याला इश्वर भेटे याच मळातुन
मुरडु नको रे नाक माणसा
तुझेही मानवपण या सार्‍या
चिखलातूनच जन्मा येते

मळ्कट रस्ता
मळकट त्याच्या दिशा
आणखी
मळभटलेली येथील जनता
मळकट मळकट आहे येथे
खरे परंतू
भरकटलेली नाही जनता
भेकड भित्री नाही जनता
म्हणून ज्याची वाट पहातो...
मळभटलेल्या याच दिशेने
ज्वलंत माझा सुर्य उगवतो

प्रेम

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,
पण बारावी म्हणजे आयुष्याच वळण…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला,
नाही म्हणाली तर कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं !

कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!…
पण ते कधी कळालचं नाही…
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं............!
नशिबात आहे ते होतच आणि ते होणारच असे वडिलधारि व्यक्ति सांगतात ????
एक मुलगा असतो त्याचा नशिबावर विस्वास नसतो त्याला कोणत्या ही कामात यश भेटत नसते
तो आयुष्याला वैताकलेला असतो त्याचे वडिल त्याल्या सांगतात पोरा असा वैताकू नकोस नसीबात असेल तसेच होईल
तो त्याचा वड़ीलानवर भड़कतो आणि म्हणतो
जर असच असेल तर मी उपासीच राहुन बगतो बगुया नशीब मला जेवायला घालतय का ??
बाप म्हणतो मुला जर तुझ्या नशिबात जेवण लिहल असेल तर देव तुला चप्पलीने मारून सुद्दा जेवायला देइल
हो हो तो तुमचा देव आणि ते नशीब
तो रागवून जंगलामद्धे निघून जातो आणि तितेच राहतो त्याची आई त्याचासाठी जंगलामद्धे जेवण घेउन जाते पण तो जेवण जेवत नाहि एक दिवस जातो दोन दिवस जातात आणि तीसरा दिवस ही जातो तरी तो जेवत नसतो ते जेवण एका झाडाखाली साठलेले असते तसेच त्या गावात चोरांचा हैदोस असतो त्यातली एक टोली चोरी करुन जंगलामधे येते त्याना भरपूर भूक लागलेली असते बगतात तर काय झाडाखाली जेवण असते चला चला मस्तच थाम्बा कदाचित गाववाल्यानी आपल्याला ठार मारन्यासाठी याच्यात विष मिश्रण केले असावे पुढे एका झाडाखाली तो मुलगा झोपलेला असतो त्या मुलाला ईकडे घेउन या प्रथम आपन त्याला जेवायला देऊ बगुया खरेच जेवणात विष आहे का?
ते त्याला घेउन आले त्यास जेवण खाण्यास सांगितले पण त्याने ते जेवण खाण्यास नकार दिला त्याने त्या चोराना सांगितले की मी हे जेवण करू सकत नाही का?? कारण की मी एक हट्य धरलेला आहे पण चोरना त्याचा कही विश्वास बसेना पाहिले ते जेवण खा.नाही अरे खा. नाही नाही नाही. त्यानी त्याला मारले तो काही ऐकेना त्या सर्वानी मिळून त्याला चप्पलीने मारले झोडपले| तेव्हा त्याने ते जेवण अखेरला खाल्ले तेव्हा त्याला समजले की नशीब नशीब नशीब आणि नशीब
पण खरच सर्व गोष्टी नशिबावर सोडून चालेल का ?
तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलीच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय....................

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..!

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..!

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..!

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..!

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..!

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप॥ मध्येच माघार घेऊ नको!
सगळीच गणितं चुकली आहेत...... !

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे !

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं !

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे !

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत.... !

Sunday, August 17, 2008

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
मनसे-- श्री. राजसाहेब ठाकरे यांनी लावलेले एक छोटेसे रोपेटे, आज या रोपेटयाने काही कालातच एक विशाल कल्पवृक्षा कड़े वाटचाल केलेली आहे.
महाराष्ट्राचा नवनिर्माण करावयाचा आसेल तर आपल्या सारखे तरुण पुढे आलेत पाहिजे.. त्यासाठी प्रत्येक तरुनाला महाराष्ट्राचा नवनिर्माण सेनेशी संलग्न होउन श्री. राजसाहेब यांचे स्वप्न साकार करण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो

Saturday, August 16, 2008


इंटरनेट वर मराठी पण जिवंत ठेवणे ही एकमेव इच्छा मनाशी ठरवून ह्या ब्लॉगची स्थापना केली आहे.

आपल्या मित्र मैत्रिणिना पाठवण्यासाठी मराठी स्क्रॅपची नितांत गरज असते.मग आपल्याला स्क्रॅपमधून मराठी स्क्रॅपशोधावे लागतात.कविता,चारोळ्या,मराठी जोक्स,नवीन साहित्य आणि इतर गोष्टीना एका छताखाली आणण्याचा हा एक प्रयत्न...

तुमच्या सहभागाची आणि पाठिंब्याची खूप गरज आहे.........

आभारी आहे